कर्जदाराचा मृत्यू : आजच्या काळात कर्ज घेणे सामान्य झाले असले तरी, कर्जदाराचा अचानक मृत्यू झाल्यास उर्वरित कर्जाचे काय होते? ते कोण फेडते? आणि गॅरेंटरवर नेमकी किती जबाबदारी येते? असे अनेक महत्त्वाचे प्रश्न कुटुंबीयांच्या मनात निर्माण होतात. या ब्लॉगमध्ये भारतातील बँकिंग नियम आणि Reserve Bank of India (RBI) च्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे, कर्जदाराच्या मृत्यूनंतर कर्जवसुली कशी होते, वारसदारांची जबाबदारी काय असते आणि गॅरेंटरला कोणत्या परिस्थितीत फटका बसू शकतो, हे सर्व सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजून घेणार आहोत.
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांनी काय समजून घ्यावे?
कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला, तर भावनिक धक्क्यासोबतच आर्थिक प्रश्नही उभे राहतात. विशेषतः त्या व्यक्तीने वैयक्तिक कर्ज, शेती कर्ज किंवा इतर कोणतेही बँक कर्ज घेतले असेल, तर “आता हे कर्ज कोण फेडणार?” हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो.
कर्जदार एकटाच कर्जदार असेल (Co-borrower नसेल) तर काय होते?
- जर कर्ज फक्त एकाच व्यक्तीच्या नावावर असेल आणि त्याला कोणताही सह-कर्जदार नसेल, तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांवर थेट कायदेशीर जबाबदारी येत नाही.
- बँक पती, पत्नी किंवा मुलांना त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नातून कर्ज भरण्यास भाग पाडू शकत नाही. मात्र याचा अर्थ कर्ज पूर्णपणे माफ होते, असेही नाही.
- कर्जदाराचा मृत्यू झाल्यानंतर बँक कर्जाची वसुली कुटुंबीयांच्या वैयक्तिक उत्पन्नातून न करता, कर्जदाराच्या नावावर असलेल्या मालमत्तेतून करते. यामध्ये बँक खाते, मुदत ठेव, घर, जमीन, वाहन किंवा इतर गुंतवणूक यांचा समावेश असतो.

कर्जदाराचा मृत्यू : Co-borrower आणि गॅरेंटर जबाबदार
जर कर्ज संयुक्तपणे (Co-borrowerसह) घेतलेले असेल आणि त्यातील एका कर्जदाराचा मृत्यू झाला, तर उरलेल्या जिवंत सह-कर्जदारावर संपूर्ण कर्जाची कायदेशीर जबाबदारी येते. तसेच, एखाद्या कर्जासाठी तुम्ही हमीदार (Guarantor) म्हणून सही केली असेल, तर कर्जदाराच्या मृत्यूनंतर बँक थेट तुमच्याकडून उर्वरित कर्जाची वसुली करू शकते. म्हणजेच मृत्यू झाला तरी सह-कर्जदार किंवा हमीदाराची जबाबदारी संपत नाही.
कर्जावर क्रेडिट लाईफ किंवा कर्ज संरक्षण विमा असल्यास, कर्जदाराच्या मृत्यूनंतर विमा कंपनी अटींनुसार उर्वरित कर्जाची रक्कम बँकेला भरते.
यासाठी कुटुंबीयांनी मृत्यूचा दाखला आणि पॉलिसीची माहिती वेळेत देऊन क्लेम करणे आवश्यक असते.
हे ही वाचा : रेशन कार्ड अपडेट : 20 हजारांहून अधिक लाभार्थ्यांचे धान्य वितरण थांबले


