अतिवृष्टी नुकसान भरपाई : गेल्या वर्षी जुलै ते ऑक्टोबर या काळात जोरदार पाऊस आणि पूर आल्यामुळे शेतीवर मोठे संकट ओढावले होते. अनेक शेतकऱ्यांची उभी पिके पाण्यात गेली, तर काही ठिकाणी शेतजमीनच वाहून गेली. त्यामुळे हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आणि त्यांच्या उत्पन्नाचा आधारच निघून गेला.
खरीप हंगामातील या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. पुढची शेती कशी करायची, खर्च कुठून भागवायचा, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले. या कठीण परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला.
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना थोडा तरी आधार मिळत असून पुढील हंगामासाठी पुन्हा उभे राहण्याची आशा निर्माण झाली आहे.
या नुकसानीचा परिणाम पुढील रब्बी हंगामावर होऊ नये, यासाठी राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तीन हेक्टर मर्यादेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे. आतापर्यंत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाली असून, त्यामुळे त्यांना रब्बी हंगामासाठी शेतीची तयारी करण्यास हातभार लागला आहे.

नुकसान भरपाई
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ३ लाख ५५ हजार शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने रब्बी हंगामासाठी मदत जाहीर केली आहे. याअंतर्गत २ लाख ७१ हजार २७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट १८७ कोटी ४३ लाख ८ हजार ७४३ रुपये जमा करण्यात आले असून, या मदतीमुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.त्यामुळे जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळाला असून, जिल्ह्यात समाधान व्यक्त केले जात आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरच ही मदत मिळेल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
या आर्थिक मदतीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या तयारीसाठी मोठा आधार मिळाला असून, शेती पुन्हा उभी करण्यासाठी आवश्यक असा ‘बूस्टर’ मिळाल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा : कृषी पुरस्कार:शेतीत नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार मानाचा सन्मान


