पहलगामचा हल्ल्याचा बदला घेत भारतानं पाकिस्तानमधल्या ९ दहशतवादी तळांवर एयर स्ट्राइक केला आहे . पहलगाम हल्ल्याचा भारतात तीव्र संताप व्यक्त होत होता , पाकिस्तानला धडा शिकवला जावा अशी मागणी होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारताला समर्थन मिळत होत. त्याच उत्तर भारतानं दिल , भारतानं पाकव्याप्त जम्मू कश्मीर (POJK) आणि थेट पाकिस्तानच्या हद्दीत घुसून १०० किमीपर्यंत कारवाई करत ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केले आहेत.
मध्यरात्री(६मे) दिडच्या सुमारास भारतीय हवाई दलान एयर स्ट्राइक केला आहे. या मोहिमेला भारतानं ऑपरेशन सिंदूर आस नाव दिल आहे. धर्म विचारून केवळ पुरुष आणि बहुतांश घरातील कर्त्या पुरुष पर्यटकांची हत्या करण्यार्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देणार्या मोहिमेचे नाव अतिशय उचित असे सिंदूर ठेवले गेले