Image reference-इराण-इस्रायल युद्ध २०२५ चा भारतावर परिणाम

इराण-इस्रायल युद्ध (Iran–Israel War) :भारतावर काय परिणाम होणार?

इराण-इस्रायल युद्धजून २०२५ मध्ये इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचा जागतिक शेती व अन्नधान्य बाजारावर मोठा परिणाम दिसून येत आहे. भारतालाही या युद्धाची झळ बसू लागली आहे.

मध्य पूर्वेमध्ये गेले काही दिवस साठलेला तणाव अखेर उद्रेकला असून, इस्रायल व इराण यांच्यात थेट युद्ध सुरु झालं आहे. या संघर्षाची सुरुवात इस्रायलकडून “ऑपरेशन रायजिंग लायन” या मोहिमेद्वारे झाली असल्याचं सांगितलं आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केलं की, “इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमामुळे आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. आम्ही माघार घेणार नाही.”
यानंतर गुरुवारच्या रात्रीपासून इस्रायलने इराणमधील अणुउद्योग केंद्रे, बॅलेस्टिक मिसाइल्स उत्पादन प्रकल्प, सैन्य तळ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर लक्ष्यबद्ध हवाई हल्ले केले.

इराणने तत्काळ प्रत्युत्तर देत “ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3” जाहीर केलं असून, इस्रायलकडे शेकडो क्षेपणास्त्रे व ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले.
दोन्ही बाजूंकडून युद्धजन्य परिस्थितीत वाढ होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

इस्रायल-इराण युद्धाचे भारतावर होणारे परिणाम

बासमती तांदळाच्या निर्यातीवर परिणाम

Image reference - इराण-इस्रायल युद्ध २०२५ चा भारतावर परिणाम

Image reference- इराण-इस्रायल युद्ध २०२५ चा भारतावर परिणाम

इराण-इस्रायल युद्ध : इराण – भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा बासमती तांदळ खरेदीदार!

पण इस्रायल-इराण युद्धामुळे हा व्यवहार अक्षरशः कोलमडून पडला आहे. सध्या इराणकडून बासमती तांदळाच्या आयातीवर पूर्णविराम लागला असून, अनेक महत्त्वाच्या ऑर्डर्स रखडल्या आहेत.परिणामी, भारतीय बंदरांवर आणि कोठारांमध्ये बासमतीचा साठा वाढतोय, पण विकला जात नाही!
या तणावपूर्ण स्थितीमुळे तांदळाच्या दरात तब्बल १५ ते २०% पर्यंत घसरण होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.यातून केवळ निर्यातदारांचंच आर्थिक नुकसान होत नाही, तर हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशातील हजारो बासमती उत्पादक शेतकऱ्यांवरही संकट ओढावलं आहे.या शेतकऱ्यांना आता आपला तांदूळ कमी दरात विकण्याची वेळ आली आहे, आणि त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्चही परत मिळेल की नाही, यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

चहा उद्योग संकटात

इस्रायल-इराण संघर्षाचं गरम सावट आता थेट भारताच्या चहा उद्योगावर पडू लागलं आहे. कोलकात्याहून इराणकडे होणारी चहा निर्यात पूर्णतः ठप्प झाली आहे — आणि ही फक्त व्यापाराची अडचण नाही, तर शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर घाला ठरतोय.

कंटेनर बंदरांवर अडकून पडले आहेत, लाखोंचा माल हालचालीविना सडू लागला आहे. निर्यातदारांना प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे दार्जिलिंग, असम आणि उत्तर बंगालमधील चहा उत्पादक शेतकरी चिंतेच्या गर्तेत अडकले आहेत.साठा विकला जात नाही, दर गडगडण्याची शक्यता वाढली आहे – आणि यातून छोट्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे

Image reference-इराण-इस्रायल युद्ध २०२५ चा भारतावर परिणाम

Image reference – इराण-इस्रायल युद्ध २०२५ चा भारतावर परिणाम

इराण-इस्रायल युद्ध-खतांच्या किंमतीत वाढ

दरम्यान, युद्धामुळे इराणमधील युरिया व अमोनिया खत प्रकल्प बंद झाले आहेत, आणि इस्रायलमधून इजिप्तकडे जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात नायट्रोजन आधारित खतांचे दर झपाट्याने वाढले आहेत. भारतातील शेतकऱ्यांसाठी ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे, कारण उत्पादन खर्चात मोठी भर पडते आहे.

तेलाचे दरही युद्धामुळे वाढले असून, त्यामुळे शेती यंत्रसामग्री, वाहतूक, कीटकनाशके आणि सिंचन यांसारख्या कामांचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा निव्वळ नफा कमी होण्याचा धोका आहे. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे उत्पादनातील अनिश्चितता आणि आर्थिक अडचणी.

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

इराण-इस्रायल युद्धाचा धगधगता आगीचा थेट परिणाम आता जागतिक तेलबाजारावर दिसू लागला आहे. अवघ्या दोन दिवसांतच क्रूड ऑइलच्या किंमती तब्बल १५% ने उसळल्या आहेत!

विशेषज्ञांचा इशारा आहे — हा संघर्ष अधिक काळ रेंगाळला, तर कच्च्या तेलाच्या दरात आणखी ८ ते ९% वाढ होण्याची शक्यता आहे.

याचा प्रभाव सध्या सर्वसामान्यांना जाणवणार नसेल, पण ही आग थेट भारतातील महागाईच्या पेटीवर तेल ओतण्याचे काम करेल.
पेट्रोल, डिझेलपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्वच गोष्टींच्या किमतीत झपाट्याने वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

होर्मुज जलडमरूमध्य (Strait of Hormuz)

इराणने आता एक धोकादायक पाऊल उचलण्याचा विचार सुरू केला आहे — त्यांच्या उत्तरेला असलेल्या “होर्मुज जलडमरूमध्य” या महत्त्वाच्या समुद्री मार्गाला बंद करण्याची तयारी सुरू आहे!

हा जलमार्ग केवळ इराणसाठी नाही, तर संपूर्ण जगासाठी जीवनरेषा आहे. कारण, जगातील सुमारे २०% कच्च्या तेलाचा व्यापार याच मार्गातून होतो. फारसच्या खाडीत प्रवेश करण्यासाठी होर्मुज जलडमरू हा एकमेव दरवाजा आहे — आणि तोच जर बंद झाला, तर संपूर्ण जगाच्या ऊर्जा सुरक्षेवर टांगती तलवार लटकणार!

जर युद्धामुळे या जलमार्गात अडथळे आले, तर इराक, यूएई, सौदी अरेबियासारख्या देशांमधून होणारा तेल पुरवठा कोलमडण्याचा धोका निर्माण होतो.
अशा परिस्थितीत भारतासारख्या तेल आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या देशासाठी ही एक अत्यंत गंभीर संकटघंटा ठरू शकते.

 परिणामी, भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रचंड झपाट्याने वाढ होऊ शकते
 आणि त्याचा थेट फटका सामान्य नागरिकांच्या खिशावर, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर आणि देशाच्या महागाईवर होणार, हे नक्की!

अधिक माहिती वाचा – ग्रामशेती पर्यटन: शेती, संस्कृती आणि निसर्गाचा सुंदर संगम

आधुनिक शेती तंत्र संपूर्ण पीक नियोजन भाग-१ : खरेदी करा




Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *