उन्हाळ्यात असा करा चारा नियोजन(Fodder management)

उन्हाळ्यात असा करा चारा नियोजन(Fodder management)

उन्हाळा म्हटलं की शेतीसह पशुपालन क्षेत्रात एक मोठ संकट उभ राहत ते म्हणजे चारा टंचाई. महाराष्ट्र मध्ये विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी चाराची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होते यासाठी आपण उन्हाळयात जो चारा आपल्याकड आहे त्याच व्यवस्थित व योग्य पद्धतीने नियोजन कारण अत्यंत गरजेचं आहे

             चारा कमी प्रमाणात उपलब्ध असतो आणि उष्णतेमुळे त्यांची तब्येतही बिघडू शकते. त्यामुळे जनावरांची वर्गवारी करून त्यांना योग्य चारा देणे खूप महत्त्वाचे असते. दूध देणाऱ्या जनावरांना सकाळी आणि संध्याकाळी थंड वातावरणात हिरवा चारा, कोरडा चारा, पेंड, गूळ आणि ताक किंवा थंड पाणी दिल्यास त्यांचे दूध उत्पादन टिकून राहते. कामकरी बैलांना सकाळी हलकं काम करून, दुपारी विश्रांती आणि गूळ-पाणी किंवा ताक दिल्यास ते थकतात नाहीत.

   कुट्टी मोठा चारा जनावरे नीट खात नाहीत आणि तो वाया जातो.जमिनीवर तुडवून खराब होतो  पण कुट्टी केल्यावर चारा बारीक होतो आणि जनावरं तो सहज आणि आनंदाने खातात. त्यामुळे त्यांना चांगलं पोषण मिळतं, पचन सुधारतं आणि दूध किंवा वजन वाढायला मदत होते. कुट्टी चाऱ्यात आपण कोरडा चारा (कडबा, भूसा) आणि हिरवा चारा (मका, नापिअर गवत) एकत्र करून देऊ शकतो. त्यात ताक किंवा गूळ टाकल्याने जनावरांना अजून चांगलं पोषण मिळतं.

थोडक्यात सांगायचं तर, कुट्टी केल्याने चारा वाचतो, जनावरं आरोग्यपूर्ण राहतात आणि उत्पादन वाढतं.

प्रोबायोटिक्स गोळ्या, पावडर किंवा द्रवरूपात मिळतात आणि चाऱ्यात किंवा पाण्यात मिसळून द्यावेत. योग्य प्रमाणात आणि पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रोबायोटिक्स दिल्यास जनावरांचे पचन सुधारते, आरोग्य टिकते आणि उत्पादनात वाढ होते. उन्हाळ्यात तापमान जास्त असते त्यामुळे जनावरांची पचनशक्ती कमी होते आणि ते थकतात. अशा वेळी प्रोबायोटिक्स दिल्यास त्यांची पचनक्रिया सुधारते आणि अन्नातील पोषण घटक शरीरात नीट शोषले जातात. त्यामुळे दूध उत्पादनात घट होत नाही. प्रोबायोटिक्समुळे जनावरांची रोगप्रतिकारशक्तीही वाढते, त्यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या जंतुसंसर्गापासून संरक्षण मिळते. थोडक्यात, उन्हाळ्यात प्रोबायोटिक्स वापरल्याने जनावरे ताजेतवाने राहतात आणि त्यांचे उत्पादन कायम टिकून राहते.

हायड्रोपोनिक्स माती विना शेती , कमी पाण्यामध्ये व कमी खर्चामध्ये चारा खाण्यासाठी कमी कालावधी मध्ये तयार होतो , उन्हाळ्यामध्ये हा एक चांगला पर्याय आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत ही पद्धत अत्यंत फायदेशीर ठरते कारण यात पारंपरिक शेतीच्या तुलनेत ८० ते ९० टक्के पाणी बचत होते, जे पाण्याच्या टंचाईच्या काळात महत्त्वाचे असते.

भुसकट – भाताचा पेंढा, गव्हाचा पेंढा, ऊसाचा भुसकट, कडधान्यांचा कचरा आणि अन्य अशा भुसकट पदार्थांचा जनावरांना खायला देऊ शकतात  पण त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा जस की  हे पदार्थ मुख्यतः फायबरयुक्त असतात, ज्यामुळे जनावरांच्या पचनप्रक्रियेस मदत होऊ शकते, पण त्यामध्ये ऊर्जा, प्रथिनं आणि इतर पोषकतत्त्वं कमी असतात. म्हणून, या भुसकट पदार्थांचा वापर जनावरांच्या आहारात एक पूरक घटक म्हणून करा , फक्त त्यांना मुख्य आहार म्हणून देणे योग्य नाही. त्यासोबत हिरवा चारा, प्रथिनयुक्त आहार किंवा इतर पोषणतत्त्वे जोडली पाहिजेत, जेणेकरून जनावरांना संपूर्ण पोषण मिळेल

जनावरांसाठी मीठ आणि गुळाचे पाणी शिंपडणे किंवा देणे हे योग्य प्रमाणात आणि काळजीपूर्वक कराव . मीठ इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यासाठी मदत करते, तर गुळ अतिरिक्त ऊर्जा आणि पोषण प्रदान करतो

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *