आजच्या काळात शेती करताना शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे पिकांचे नुकसान.
हवामानातील अनिश्चित बदल, अवकाळी पाऊस, पाणीटंचाई या संकटांबरोबरच अजून एक गंभीर आणि वेदनादायक समस्या म्हणजे रानडुक्कर, हरणं, नीलगाय, वानर यांसारख्या वन्य प्राण्यांकडून होणारं पीक नुकसान. हे प्राणी पिकं उद्ध्वस्त करतात, माती चिखलवून टाकतात आणि मेहनतीवर पाणी फेरतात.
याच संकटावर तोडगा म्हणून महाराष्ट्र शासनानं सुरू केली आहे – “तार कुंपण अनुदान योजना”.
या योजनेतून शेतकऱ्याला शेताभोवती काटेरी तारांचं कुंपण करण्यासाठी थेट ९०% अनुदान दिलं जातं – म्हणजे केवळ १०% खर्च शेतकऱ्याच्या खिशातून!
या योजनेचा उद्देश काय आहे?
- शेतातील उगवती पिकं वन्य प्राण्यांपासून वाचवणे
- पिकांचं उत्पादन टिकवणे आणि शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान टाळणे
- शेतकऱ्याच्या मेहनतीचं संरक्षण करणे
योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधा :
- २ क्विंटल काटेरी तार
- अंदाजे ३० लोखंडी खांब
- आवश्यक जोड साहित्य
- हे सर्व साहित्य शासन अनुदानावर उपलब्ध करून देतं
पात्रता आणि आवश्यक अटी :
- शेतजमिनीवर कोणताही कायदेशीर वाद नसावा
- जमीन अतिक्रमणमुक्त असावी
- वन्य प्राण्यांचा नियमित वावर असलेलं क्षेत्र असावं (ग्राम समिती/वन खात्याचं प्रमाणपत्र आवश्यक)
- कुंपणामुळे प्राण्यांच्या नैसर्गिक मार्गात अडथळा येता कामा नये
अर्ज करण्याची प्रक्रिया :
- जवळच्या पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधा
- विहित नमुन्यात अर्ज भरून ग्रामविकास अधिकारी किंवा संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे सादर करा
- अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडा:
- सातबारा उतारा
- गाव नमुना ८ अ
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र (मागासवर्गीय असल्यास)
- इतर मालक असल्यास हक्कपत्र
- ग्रामपंचायतीचा दाखला
- वन अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र (वन्य प्राण्यांच्या उपस्थितीबाबत)
या योजनेचे फायदे :
शेताभोवती सुरक्षा तयार होते
प्राणी घुसण्याचे प्रमाण कमी होते
उत्पादनात वाढ होते
सतत शेतावर लक्ष ठेवण्याची गरज राहत नाही
शेतकऱ्याला आर्थिक फायदा
शासनाची ही योजना म्हणजे केवळ कुंपणासाठीचा अनुदान नाही, तर शेतकऱ्याच्या श्रमाचे, पिकांचे आणि भविष्याचे संरक्षण आहे. जर तुमच्या शेतात वन्य प्राण्यांचा त्रास असेल, तर वेळ वाया न घालवता लगेच या योजनेसाठी अर्ज करा आणि ९०% अनुदानाचा फायदा घ्या.
बचत, सुरक्षा आणि शाश्वत शेती – तीच तार कुंपण योजना!