मिरचीवरील चुरडा-मुरडा रोग (Chilli Leaf Curl Virus) हा मिरची पिकावर आढळणारा एक गंभीर विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचा फैलाव मुख्यतः रसशोषक किडींमुळे – विशेषतः पांढरी माशी, मावा आणि फुलकिडे यांच्या माध्यमातून होतो. या रोगाची लक्षणे सहज ओळखता येतात – मिरचीची पाने लहान होत जातात, त्याच्या कडा वरच्या बाजूस वळतात आणि पाने कुरकुरीत होतात. आणि फळे विकृत होतात. उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होते आणि झाडाची जीवनशक्ती कमी होते.
अनेक शेतकरी मिरचीच्या लागवडीकडे आकर्षित होत आहेत, कारण तिची मागणी देशांतर्गत तसेच निर्यातीतही मोठ्या प्रमाणावर असते. परंतु, या पिकावर अनेक रोग व किडींचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे उत्पादनावर गंभीर परिणाम होतो. त्यातीलच एक प्रमुख व गंभीर रोग म्हणजे चुरडा-मुरडा रोग, ज्याला इंग्रजीत Leaf Curl Virus असे म्हणतात. हा रोग मिरचीच्या झाडांची वाढ खुंटवतो, पाने कुरळीसारखी वळतात आणि उत्पादनात मोठी घट होते.

चुरडा-मुरडा रोगाची लक्षणे:
चुरडा-मुरडा रोगाची लक्षणे मिरचीच्या पानांचा आकार लहान होणे, वळणे, आणि कुरकुरीत होणे अशी असतात. पानांवर गडद ठिपके आणि रेषा दिसतात, आणि पिकाची वाढ मंदावते. मिरचीचे फुल आणि फळे लहान आणि विकृत होतात, तसेच पांढरी माशी, मावा आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढतो.
चुरडा-मुरडा रोगाचे नियंत्रण उपाय:
शुद्ध आणि रोगमुक्त बियाणे वापरा : सुरुवातीला, शुद्ध आणि रोगमुक्त बियाण्यांचा वापर करावा, कारण रोगाची सुरुवात रोपवाटिकेपासून होऊ शकते. रोगाची लक्षणे दिसताच, झाडे त्वरित उचलून नष्ट करावीत, जेणेकरून रोगाचा प्रसार इतर झाडांवर होणार नाही., पिकांची योग्य आंतरमशागत, तणांचे नियंत्रण आणि स्वच्छ शेतीसंपदा राखणे हे देखील रोग नियंत्रणासाठी आवश्यक आहे. सतत एकाच कीटकनाशकाचा वापर टाळून विविध प्रकारची फवारणी वापरणे फायदेशीर ठरते.
फवारणी : चुरडा-मुरडा रोगाचा मुख्य प्रसार पांढरी माशी, मावा आणि फुलकिडे यासारख्या रसशोषक किडींच्या माध्यमातून होतो त्यासाठी इमिडाक्लोप्रिड किंवा थायोमेथोक्झाम (Confidor किंवा Actara) यासारख्या रासायनिक कीटकनाशकांचा वापर प्रभावी ठरतो मिरचीच्या रोपांची वाढ सुरू झाल्यावर, म्हणजेच साधारण 15–20 दिवसांनी इमिडाक्लोप्रिड (0.3 मि.ली./लिटर पाणी) ची फवारणी करावी. 20–25 दिवसांनी किडींचा प्रादुर्भाव दिसल्यास थायोमेथोक्झाम (0.25 ग्रॅम/लिटर पाणी) ची फवारणी करा. त्यानंतर 15–20 दिवसांनी पुन्हा इमिडाक्लोप्रिड किंवा थायोमेथोक्झाम फवारावे. जर आवश्यक असेल, तर नीम तेल (5 मि.ली./लिटर पाणी) वापरून जैविक उपाय करा. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करा आणि विविध कीटकनाशकांचा वापर करा, जेणेकरून कीटकांचा प्रतिकार न होईल.
त्याचप्रमाणे, जैविक उपायांमध्ये नीम अर्क किंवा नीम तेल सारख्या पदार्थांचा वापर केल्यास किडींचे नियंत्रण करता येते.
चिकट सापळ्यांचा वापर : शेतात पिवळे चिकट सापळे पांढरी माशीसाठी आणि निळे चिकट सापळे फुलकिड्यांसाठी लावावीत. पिकांच्या दरम्यान योग्य अंतर ठेवून, हवा खेळती राहील याची काळजी घ्या आणि तण तसेच रोगवाहक झाडे नष्ट करा. संमिश्र पद्धतीने फवारणी करणे आवश्यक आहे, कारण एका प्रकारचे कीटकनाशक वारंवार वापरल्याने कीटकांचा प्रतिकार होऊ शकतो. या सर्व उपाययोजनांचा एकत्रितपणे अवलंब केल्यास चुरडा-मुरडा रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते, आणि मिरचीचे उत्पादन अधिक चांगल्या प्रतीने मिळवता येते.